Thursday, 8 December 2011

पत्र ३

Hiii राधा!!!

तू खूपच इम्प्रेस झालेली दिसत्येस !!नाही म्हणजे ते असतीलही खूप छान वगरे.पण एवढी काम एकत्र करणारी व्यक्ती नक्कीच वेडी असणार.......तुला हे आत्ता पटणार नाही,थोड्या दिवसांनी नक्कीच पटेल.
ते जाऊ दे!कशी आहेस तू?कॉलेज कस चाललय?अभ्यास करतेस ना  मधून मधून तरी!! :P
"गांधीहत्या आणि मी"नाही झाल वाचून माझ.सुरुवात वेगात होती पण नन्तर जरा कंटाळाच आला मला.एकसुरी वाटलं ग.अजून अर्धच वाचलय.पण मला एक कळत नाहीये,नथुराम गोडसेंनी गांधीजींचा वध केला (असाच लिहिलंय न) त्याबद्दल फासावारही गेले.आपण इतिहास तर बदलू शकत नाही,मग त्याची एवढी चर्चा कशाला करायची??गांधीजींची आठवण तर त्यांचा आडनाव लावणाऱ्या लोकांनाही नाहीये आणि आपण उगाच आपला वेळ वाया घालवतोय!!!

हं angels and demons मस्तच आहे.पण त्यात लगेच dan brown प्रेम वगरे करण्यासारखा काय आहे त्यात??/तुम्ही मुली पण न चायला......जे समोर दिसतात त्यांन तुम्ही चुकूनही भाव देत नाही आणि जो लेखक भेटण्याची शक्यताही फार कमी आहे अशा माणसावर प्रेम वगरे करत बसता.........

आता जरा मूळ मुद्याकडे वळूया.तुझं पत्र वाचल्यावर मला असं वाटतंय की तुला refreshment ची अतिशय गरज आहे.खूप दिवसात काही वेगळा केला नाहीस का?म्हणजे काहीतरी छंद......संगीत,खेळ आणि महत्वाचा म्हणजे य वर्षांपूर्वी सोडून दिलेला लेखन.तू बहुतेक आजकाल काही लिहीतच नाहीस न (अर्थात ही पत्र सोडून)?आणि जरा पकाव वाटेल पण खरं सांगतोय,PLAN YOUR DAY,LOVE IT AND ENJOY IT!!सारखा दिनक्रम बदलला तरीसुद्धा त्रास होतो.म्हणजे एक दिवस लवकर उठायच,एक दिवस जागायच असं करू नकोस.त्रास होईल तुलाच!(आणि पर्यायाने मलाही).

इथे आता हळूहळू नाताळची तयारी सुरु होत्ये.एकदम दिवाळीसारखा वातावरण आहे.सुट्टीच्या वारी दुकानातली गर्दी,भरपूर सवलती,एकावर एक मोफतच्या  पाट्या,काही विचारू नकोस!!!कधी कधी मला असं वाटत की आपण उगाच खर्च करतो.सगळ तर असत आपल्याकडे.वर्षभर खरेदी चालूच असते.दिवाळीसाठी वेगळ काय घायच आणखी?आणि भेटवस्तूंच म्हणशील,तर काय घ्याव हेही सुचत नाही कधी कधी.सगळच तर असत आपल्याकडे.ना  घेणाऱ्याला अप्रूप ना  देणाऱ्याला!उगाच बाजारात चलन फिरवत रहायचं इकॉनॉमिक मोबिलीटी का काय ते!त्यातही 'अर्थ"शास्त्र आहेच!"ह्याने मला ५०० रुपयाची वस्तू दिली म्हणजे मलापण द्यायलाच हवी."अरे काय आहे हे?वस्तू महत्वाची आहे,तिची किंमत महत्वाची आहे की त्यामागची आपुलकी,प्रेम?उठसूट सगळ्यांना वस्तू देत सुटायच,मग ती व्यक्ती आवडो किंवा न आवडो.ह्याला काय अर्थ आहे? फक्त "लोकं काय म्हणतील"म्हणून भेटवस्तू देण किना घेण मला पटत नाही ग! खोट कशाला वागायच?कालच माझा वाद झाला आईशी.पण तिला काय,कोण आणि कसा सांगणार?शेवटी मीच थांबलो.एकतर बऱ्याच दिवसांनी मला जरा जास्त वेळ होता फोनवर बोलयला,त्यातही वादच घातला.उगाच भांडलो यार मी आईशी!!!मला खूप विचित्र वाटतंय.कधीतरी मी काय वेड्यासारखा वागतो ना .....एकदम विक्षिप्त! माझी जशी वेगळी मत आहेत तशी तिचीही असू शकतात की!एरवी व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने ओरडायच आणि असं वागायच.....किती वाईट न! आई,मी चुकलो,मला माफ कर!!!
अजून काही लिहू शकत नाहीये.थांबतो इथेच.

-जय
१० नोव्हेंबर २०११
ता.क.-take care!!.love  you!

Sunday, 27 November 2011

२.१

३० ऑक्टोबर
Hello जय
कसा आहेस?आता तू तिथल्या वातावरणाला सरावला असशील अशी आशा आहे.पण दिवाळीची लांबलचक सुट्टी नाही ना  या वर्षी!!चालायचच!अरे हो विसरायच्या आधी सांगते,तुझे दिवाळीचे फोटो बघितले.त्यात तू चक्क छान दिसतोयस.हाहाहाह!!
आम्ही सगळ्यांनी दिवाळीत मज्जा केली.यावर्षी मी अनारसे करायला शिकले.मस्त वाटलं नव काहीतरी शिकून.आपण काय फराळ केलात दिवाळीत?तुला तर काही करताच येत नसेल न.....कठीण आहे!!
 "गांधीहत्या आणि मी " वाचून झाल का?मला आवडलं.मी सध्या "Notes to Myself''नावच पुस्तक वाचत्ये.वेगळच आहे रे....जे जे जेव्हा जेव्हा सुचलं ते ते त्यात लिहिलंय.कधी एक ओळ किंवा कधी अख्ख पान.एकदम मनापासून लिहिलेला पुस्तक वाटलं मला.हे आणखी एक माझ Angels and Demons वाचून झाल.जाम भारी आहे रे!!!हातातून सोडवासच वाटत नाही.i just love Dan Brown!!!!
मला न तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे.कधी कधी मला मी काहीच करत नाही असं वाटून खूप उदास वाटत रे.सगळेजण कशात न कशात अडकलेले आहेत.मला जेव्हा वेळ असतो,तेव्हा सगळे मला भेटत नाहीत.मग अजूनच वाईट वाटत.मी काय करत्ये,कशासाठी करत्ये हेच कळत नाही कधी कधी.एकदम अडकल्यासारख,निष्कारण कशात तरी गुंतल्यासारख वाटत .काय कराव तेच कळत नाही.असं झाल न की मग दिवसच वाईट जातो चायला.....धड अभ्यास होत नाही,पुस्तक ,टीव्ही,गाणी कशातच मन लागत नाही.तुला खूप पकवलं तर नाही न???/
सध्या सुट्टी सुरु आहे.त्यामुळे अजूनच रिकामा वेळ आहे. असो!!ए,तुम्हाला जोशी सर् होते का रे??काय भारी आहेत .काय काय करतात ते.जामच भारी.!!!फोटोग्राफी,चित्र,संशोधन आणि बरच काही.तुला माहित्येत ते???म्हणजे त्यांनी शिकवलेल सगळ कळतच असं नाही,पण तरीही ते भारीच आहेत.
तुला पत्र लिहायला लागल्यापासून छान वाटत रे.खूप दिवसात काही लिहिल नाही ना की विचित्र वाटतं एकदम.अरे जाता जाता एक मजा सांगते.मी नवा ब्लॉग लिहायला घेत्ये.बघ वेळ मिळाला तर वाच.तुझ्याशी खरं तर खूप बोलायचय.पण आता थांबते.एकतर फार रात्र झाल्ये आणि हे पत्र मला उद्याच्या उद्या पोस्ट करायचय.म्हणजे ते तुझ्यापर्यंत लवकर पोचेल ना!!
काळजी घे रे बाबा!!आणि हो गिर्यारोहण करताना "आरोहण "करायचं हे ध्यानात असू द्या.थोडा कमी धडपड बर का!!!बाय!!!
miss you!!!
-राधा

Friday, 18 November 2011

पत्र २


हाय राधा,


तुला माझं पत्र बघून सुखद धक्का बसला,हे ऐकून मला छान वाटलं आणि हो मला असे धक्के द्यायला आवडतील.चायला पण तुम्ही लोकं मला सोडून मजा करताय ना ....पिक्चर काय नाईटआउट काय......चालायचच....माझी आठवणही येत नाही का रे तुम्हाला शहाण्यांनो....जाऊ दे .मी  पण इथे मजाच करतोय आणि करणार आहे.
उद्या आम्ही ट्रेकला जायचा बेत केलाय.५ वाजता निघणारोत घरातून.माझा इथला पहिलाच ट्रेक असेल....मजा येईल अशी आशा आहे.आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी म्हणजे चक्क मी आठवणीने कॅमेरा घेतलाय.त्यामुळे आता स्वत:चे फोटो मी स्वत: अपलोड करेन.आज तयारी करताना तुझी खूप आठवण आली.अरे काय तयारी असायची तुझी सेफ्टी पिनेपासून दोरी,औषधं,खाणे काय नि काय..माझ्या डोळ्यांसमोर आपण केलेला ट्रेक न  ट्रेक उभा राहिला.सगळ्यात पहिला ट्रेक म्हणजे....रायगडचा ना??आपण असे चेहेऱ्याने ओळखत होतो एकमेकांना..पण भेट तिथेच झाली होती.मला त्याआधी तू जरा वेडीच वाटलेलीस,२ दिवसांच्या ट्रेकसाठी एवढी औषध वगरे हवीत कशाला!!पण माझा स्वत:चाच पाय वाईट मुरगळला तेव्हा तेच उपयोगी पडल होत.तेव्हापासून जेव्हा आपण भेटतो तेव्हा  प्रत्येक वेळी मला तुझ्याबद्दल  काहीतरी  नवी गोष्ट कळते आणि मग असं वाटत "अरेच्चा!हे माहितीच नव्हत मला!"
मी कालच गांधीहत्या आणि मी वाचायला घेतलाय.प्रभावशाली आहे नक्कीच!आता कोणती मत बरोबर आहेत वगरे नाही सांगू  शकत मी आत्ता,पुस्तक पूर्ण झाला की बोलूच.अरे माझी  आणखी दोन पुस्तक वाचून झाल्येत ,तू पण वाच-कथा माणसांच्या -लेखक उत्तम कांबळे आणि लाईफ -लुईसे हाय.मस्तच आहेत.खूप असं साहित्यिक वगरे वाटेल पण आयुष्यावर ,जगावर,इथल्या माणसांवर अचूक भाष्य करणारी पुस्तकं वाटली.चर्चा करायची आहे जरा.
 आणि एक महत्वाची गोष्ट.मी सहाय्यक लेखक म्हणून काम करतोय .आमच्या कॉलेजात ड्रामासोसायटी आहे ना त्यात मला अभिनायासाठीही  निवडलाय पण मी स्क्रिप्ट पण लिहायची म्हणतोय.सध्यातरी सहाय्यकाची भूमिका पार पाडेन.
जुईला माझ्यातर्फे अभिनंदन सांग.मी तिला मेल केल्ये,पण काय आता बाईना वेळ असेल नसेल...तेव्हा तू पण सांग.नाहीतर चिडायची उगाच.तिचा राग कोण ओढवून घेणार!फुकटचा मार पडायचा.तिची निवड झाली हे बेस्टच आहे पण तुला एवढा छाssन वाटण्याच कारण काय? जाऊदे मला फ्रोएड आठवला.असो...जरा वेडंच लागलाय मला.
बाकी काय ठाणे काय म्हणतंय?सगळ्यांना माझ्याकडून शुभ दीपावली सांग.
बाय!
-जय
१९ ऑक्टोबर २०११
ता.क.मला पत्राच्या शेवटीच तारीख लिहायला आवडते .ती गोष्ट पूर्ण झाल्यासारखा वाटतं.दिवाळीत फोन करेन.take care !!मिस यु !!!!



Monday, 7 November 2011

पत्र १.१.

१० ऑक्टोबर २०११
Hello जय
तुझं पत्र हा माझ्यासाठी एक सुखद धक्का होता.मला वाटलच नव्हत की तू एवढ्या लगेच पत्र पाठवशील.धन्यवाद!!!!!
तू असं लिहिल्यास की तुला ४-५ दिवस कोणी न भेटल्यामुळे विचित्र वाटतंय.तशीच परिस्थिती इथेही आहे.परवा नाटकाला जायच ठरवल तेव्हा तुला सवयीने फोन लावला आणि काकुनी फोन उचलल्यावर लक्षात आल की तू नाहीचेस इथे!!आणि शिवाय आपले स्पेशल संवाद आणि मग नन्तर मारलेले टोमणे हे सगळ आम्ही मिस करतोय रे!!
तू नव्या मित्रांशी जुळवून घेतोयस हि चांगली गोष्ट आहे.आणि महत्वाच म्हणजे तुला जे वाटतंय ते सांगितलस ही  पण एक चांगली गोष्ट आहे.आत्ता मुद्द्याची गोष्ट-आता कळल न तुला घरातल्या बायका कित्ती काम करतात ते !!!.तू एकदा म्हणालेलास "स्वयपाक करण्यात कसल आलय काम???" आता कळल न!!!हो आणि पोळ्या केल्या नाहीस हे उत्तम झाल नाहीतर त्यांचा आपल्या जेवणाविषयी फारच गैरसमज झाला असता नाही का:P.
आता महत्वाच्या प्रश्नाकडे वळूया.तू असं लिहिल्यास की तुला एकट,रिकाम,आणि विचित्र वाटतंय.माझ्या मते असं वाटणा साहजिक आहे.तू एकदा तिथे रमलास की तुला निश्चित चांगल वाटेल.Believe me you can cope with that and if we look at this situation from other perspective,you got time to look within.स्वत:मध्ये डोकावून बघ.तुला पुष्कळ झाकलेल्या,दडलेल्या गोष्टी सापडतील,प्रश्न काळातील.त्यांचा आनंद घे.प्रश्नांशी खेळ.कदाचित तू सगळे खेळ नाही जिंकू शकणार पण कमीत कमी तुला हे तर कळेल की कस खेळायचं.
अरे खेळावरून आठवलं,आपली जुई आहे न,तिची राष्ट्रीय महिला कब्बडी संघात निवड झाल्ये.तिच्या मेहनतीच योग्य फळ तिला मिळाल.त्याल्मुळे सध्या बाईंकडे वेळ नाहीये.मलासुद्धा फोनेवरच सांगितल.एका महिन्याने कॅम्प आहे म्हणाली.अजुन एक मेम्बर कमी झाला गप्पा मारायचा आणि भटकण्याचा!!
बाकी इथे सगळे मजेत आहेत.माझ M.A.आत्ता कुठे सुरु होतय .नव्याचे नऊ दिवस म्हणून असेल कदाचित पण reference work वगरे सुरु आहे.अचानक मोठं झाल्यासारखा वाटत रे!कॉलेजची खूप आठवण येते.आणि आपण कशी मज्जा केलेली तेसुद्धा आठवतं.
हा आणि अजून एक मी वाचल मला MSW करायला हव होता वगरे...पण आवडीला profession केलं की त्यातली मजा जाते.आणि समाजसेवेसारखी  गोष्ट व्यवसाय म्हणून करायला मला नाही आवडणार....जे आहे हे उत्तम आहे.
असाच पत्र लिहीत रहा.मला पत्र वाचायला आणि पत्रांना उत्तर द्यायला आवडतात हे तुला काही नव्याने सांगायला नको आणि मलापण कळेल ना तुझे काय उद्योग-धंदे चाललेत ते!!:P
काळजी घे!!!
-राधा
ता.क.तारीख पात्राच्या शेवटी नाही सुरुवातीला लिहायची असते.:P

Saturday, 5 November 2011

पत्र १

HI राधा!!
इथे अमेरिकेत येऊन १ आठवडा होत आला,हा पहिलाच weekend!आत्ताच freshers partyहून घरी(?)आलोय.बऱ्याच नव्या ओळखी झाल्यात,होत आहेत.नवीन वातावरणाचा अंदाज घेत संभाषण सुरु आहे.४-५ दिवस कोणीच ओळखीच भेटलेल नाहीये त्यामुळे जरा विचित्र वाटतंय.पण त्याचीही सवय होईल अशी आशा आहे.हे विचित्र वाटण मला नीट सांगता येत नाहीये म्हणून असेल कदाचित पण तुझ्याशी बोलावसं वाटलं.मला माहित्ये कि तू हे समजून घेशील नाहीतर एरवी smsला reply द्यायलाही कंटाळणारा मी अचानक पत्र कसा काय लिहितोय याच मलाही आश्चर्य वाटतंय.असो!!
आम्ही सध्या चारजण एकत्र राहतो.त्यातला एक भारतीय आहे.स्वामी.म्हणजे त्याचा नाव  काहीतरी भलामोठ्ठ आहे पण इथे आम्ही सगळे त्याला याच नावाने हक मारतो.या एका आठवड्यातला अनुभव तरी चांगला आहे.एकमेकांचा अंदाज घेणा चालू आहे.स्वामी जाम बडबड करतो.बाकीचे दोघे हळू हळू ओपन होतायत.अरे एक मज्जा-काल माझी जेवण करण्याची पाळी होती.जी काय वाट लागलेली न........चायला आई एवढी वर्ष रोज स्वयपाक कसा करत असेल!!!आणि शिवाय आईचा स्वयपाक दीड-दोन तासात होतो.मला काळ ३ तास लागले.तरी बर मी पोळ्या केल्याच नव्हत्या,कारण त्या मला झेपल्याच नसत्या.भात,आमटी,भाजी आणि कोशिंबीर करून वेळ मारून नेली.इथे जॉन खूप छान स्वयपाक करतो.परवा छान नूडल्स केलेल्या त्याने,त्या तरी छान होत्या!एकंदरीत काय तर इथे बाकी सगळ छान चाललय.ठीक नाहीये तो मीच!!
आयुष्यात पहिल्यांदाच असं रिकाम आणि एकट वाटतंय,तरी इथे काय नाहीये-एकतर अभ्यास आणि कॉलेज,मग घरी आल्यावर मित्र वगरे असतातच,पुस्तक आहेत,३६ GB गाणी आहेत.पण तरीही एकट वाटतंय.घरी २ वेळा फोन करून झाला पण मनाच समाधान होत नाहीये.आणि काय ग शहाणे मी तुलाही फोन करत होतो मगाशी.कुठे जाऊन बसलीस की काय गावात समाजसेवा करायला!!!तुझा न PROFESSIONचुकलय.तू M.Aपेक्षा MSW कर.:P.JOKES APART पण मी तुला आत्ता पत्र लिहायला घेतलय ते याच कारणासाठी!म्हणजे तू प्रवासात,भटकायला,इकडे तिकडे गेलीस तरी तुला हे पत्र नक्की वाचता येईल आणि मलाही!(अर्थात तू लिहिलस तर!)कारण बाकी कोणालाच मी पत्र लिहीत नाहीये.
बाकी तू कशी आहेस?कॉलेज सुरु झाला का?किती वेळ लावणारे तुमची MU?तिथे बाकी सगळे कसे आहेत?काका,काकू,आजी आणि आजोबांना माझा नमस्कार सांग.आता पकावण थांबवतो.रात्रही खूप झाल्ये आणि मुख्य म्हणजे मला अतिशय झोप आल्ये.


-जय
१ ऑक्टोबर २०११.
ता.क.-तुझी पत्र लिहिण्याची IDEA झकास आहे बर का!इतके दिवस फक्त वाचलेल पुस्तकात पण आता खरच छान वाटतंय.THANK YOU!!TAKE CARE!!!!