Wednesday, 16 May 2012

४.१

१५-२-२०१२
हाय जय!!

अगदी मनापासून माफी!!मला वाटलं नव्हत की तू इतका रागावशील....अरे पण मी मजा करत होते न यार!आणि तुही जांभळ्या पेनने लिहिल होतसच की!!! जाऊ दे! आधीच मी खूप दिवसांनी पत्र लिहित्ये..त्यातपण भांडण नको...

स्वयंपाक करता यायला लागल्याबद्दल अभिनंदन..अशीच प्रगती होत राहो!!मला कधी बोलावाणारेस तुझ्या हातच जेवायला?आणि काय रे नाताळात  एकएकट्याने सगळा केक बिक खाल्लास ना ,काही लाज बीज आहे कि नाही!!!! 

परवाच दोन्ही जर्नल्स सबमिट केली..आता जरा हायसं वाटतंय.त्यामुळेच वेळ नाही रे काढता आला असं नीट छान पत्र लिहायला!एप्रिल मध्ये माझी परीक्षा आहे....आपल मत आणि अभ्यासाबद्दल मार्गदर्शन अपेक्षित आहे।

तू काकूला पत्र लिहिणारेस हे वाचून खूप छान वाटलं.आता ठीक आहेस ना?उगाच रडवी गाणी ऐकून रडत नको बसूस हा फार वेळ,पूर वगरे यायचा!! मजेची गोष्ट सोड पण खरच सांगत्ये,तुलाच त्रास होईल मग! पत्र लिहिणारेस न काकूला, ते छान आहेच पण माझं ऐकलस म्हणून जास्त आनंद झाला..आता मला  तुझ रंगीत पेन न वापरण्याबद्दल ऐकण भाग आहे...

काय मग वालेनटाईन  डेला काय केलस विशेष?माझी एक मैत्रीण डेटला गेली होती.किती मस्त ना..अजून तिने सगळ्यांना वृत्तांत सांगितला नाहीये..पण सगळ सविस्तर ऐकवायला लागली ना ती,की कधी कधी असं वाटत की चायला आपल्या आयुष्यात काही थ्रिल्लिंग घडतच नाही यार!! तेच ते कॉलेज,तोच तो अभ्यास आणि लोकांचे प्रोब्लेम्स ऐकून मदत करण..मग ते अगदी प्रेमप्रकरण का असेना..कधी कधी खूप कंटाळा येतो यार!जाऊ दे! तुझ्या डोक्याशी अशी कटकट करून काय होणारे?

मी पण अर्तीस्त बघितला.खूपच मस्त आहे न....सगळा पिक्चरच भारी आहे....काही चूक काढण्यासारख कोणालाच सापडल नसेल..एकदम परफेक्ट!! काही वाचलच नाही रे..या जर्नल्सच्या नादात!!

मी ना या सुट्टीत फोटोग्राफी शिकायच म्हणत्ये!आणि पंचवार्षिक योजना असलेल फ्रोईडचा पुस्तक पण! बघुया काय काय पूर्ण होता ते!तू इथे येणारेस का सुट्टीत?तुला खूप भेटावसं वाटतंय.काल मला तुझी खूप आठवण येत होती..खूप म्हणजे खूप जास्त.....
थांबते इथेच! काळजी घे!काही लागल तर सांग.
-राधा 

Saturday, 24 March 2012

ए राधा ,
ही कसली शिक्षा आहे??गुलाबी शाईने पत्र?????एकदम बाद.....शून्य मार्क......तो रंग काही जीवनात रंग आणत नाहीये...माझा असलेला रस घालवतोय पत्र वाचण्यातला.....प्लीज परत त्या रंगाने पत्र लिहू नको ह मला..मी उत्तर देणार नाही......
खरं तर तुझी माफी मागायची होती..एवढ्या उशिरा उत्तर देतोय म्हणून...पण...ती गुलाबी शाई बघून...असो..

सध्या जरा खूप काम चालू आहे.आत्ताच नाताळची सुट्टी संपले..इथे आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली....भरपूर केक वगरे वगरे...आता परत जोरात कामाला लागला हवं..सगळी मज्जा म्हणजे एक वेगळा पत्रच होईल..पण ते ठीक आहे...नेटवर बोलू शकतो ते! खूप बोलायचंय.मी परवा आरतिस्त बघितला..खूप मस्त सिनेमा आहे.वेळ मिळाला तर जरूर बघ.मला आवडेल चर्चा करायला.

तुझी भेटवस्तूनबद्दलच तत्व मला थोडा थोडा पटलय.पण तरी माझे विचारही मला पटलेलेच  आहेत..अजूनही.मी आईला पत्र लिहिण्याचा प्रयत्न करेन पण जरा कसातरीच वाटतंय..कधी आईला पत्र नाही लिहिलंय मी अजून...तज्ज्ञाची मदत अपेक्षित आहे...मी परवाच सलील कुलकर्णीची अंगाई ऐकली लहान मुलाने आई वडिलांना म्हटलेली!!सांगायला कसातरीच वाटतंय.एक वेगळा अनुभव आला मला.चक्क डोळे पाणावले होते आई-बाबांची आठवण येऊन.असं कधी माझ्या बाबतील होईल असं मला माझ्या उभ्या-आडव्या कुठल्याच आयुष्यात वाटलं नव्हत.

मी फायनली चांगली भाजी आणि खाता येतील इतपत पोळ्या करायला शिकलोय.चांगल वाटतंय नव काहीतरी शिकून.आधी विशेष झेपत नव्हता पण म्हटल,जसं शाळेत असताना नावडीचे विषय जमवले..तसा हेही मला येईल. का नाही येणार...आणि आता जरा बऱ्या झेपतायात..

माझा सल्ला ऐकलास हे ऐकून बर वाटलं.कसा चाललाय अभ्यास?परीक्षा कधी आहे?आत्ताच शुभेच्छा.तुला माहित्ये मी कदाचित विसरुही शकतो.छान अभ्यास कर.अभ्यासावरून आठवलं तुला जोशी सर आवडले किंवा काय ह्यात मला काहीच प्रोब्लेम नाहीये ग!पण मी आपला सांगून ठेवलं...:पण  तुला कोण कोण आवडू शकेल याची मला कल्पना आहे.मोस्टली सगळे असे अभ्यासात वगरे वेडे लोकं...खरं न??त्याच काय आहे..आपल्याकडे जे नसत ना ..तेच लोकांना आवडत......असो.

आणि सध्या काय नवीन बातमी?पुढच्या वर्षीचा काय प्लान आहे?तिथे सगळे कसे आहेत?मला मध्ये मध्ये सगळ्यांची खूपच आठवण येते...आपण जेव्हा जवळ असतो तेव्हा आपल्याला कळत नाही न की आपल्या आजुबाजूची माणस आपल्यासाठी किती महत्वाची असतात ते...मुख्य म्हणजे आपले मित्रमैत्रिणी,घरातली सगळी माणस...त्यांच्यापासून लांब गेल की कळत की आपण घरातला साध गुलाबाच झाडही  आठवून खट्टू होतो......
थांबतो इथेच....काळजी घे..
-जय
५ जानेवारी २०१२
ता.क.मी तुला रागारागात नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला विसरलो..
हैप्पी न्यू इअर!! :)








Monday, 2 January 2012

३.१

१ -१२-२०११

हाय जय,
आज बऱ्याच दिवसांनी पत्र लिहित्ये...म्हटल तू सांगितलेली गोष्ट जरा ऐकून बघू.म्हणून नियमितपणे बाकीची काम करण्याचा प्रयत्न केला खरं,पण मला आवडणारया काही काही गोष्टी जसं की तुला पत्र लिहिण,त्याला वेळच नाही काढला.माफी असावी!!पण ह्या गोष्टीचा खरच उपयोग होतो.सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे मला सकाळी सकाळी परत झोप येत नाही.

मला एक सांग तू कधीपासून रंगीत शाईने लिहायला लागलास??तुला आवडत नसे न काळ्या नाहीतर निळ्या  पेन सोडून बाकीच्या पेनाने लिहिलेल.....आता आवडत वाटतं!!!!मी आता मुद्दाम लिहिलंय रंगीत पेनने.It's like adding colours n life to it!!! पण मला एक सांग हा बदल झाला कसा??काय रे प्रेमात बिमात पडल्यास की काय??

हं प्रेमावरून आठवलं,तू कशाला शिव्या घालातोयास मुलीना??? my reaction regarding Dan Brown was genuine.i love him for his books.काय भारी आहे तो!!आणि काय रे मी  कशाला वेडी आहे?मला पिडण्याचा चंग बांधल्यास का तू?मला खरच जोशी सर आवडतात.हो ते वेडे असले तरीही,विक्षिप्त असले तरीही.पण तुला का त्रास होतोय त्याचा?असो.

ह आता तुझे प्रश्न...भेटवस्तू.......मला एक सांग,तुला जर कोणी गिफ्ट दिली,तर तुला कसा वाटतं???तुझ्या चेहेऱ्यावरचे  भावच सांगतायत की तुला मस्त वाटत.मलाही मस्त वाटतं.आणि मला असं वाटतंय की स्वत:ला मिळालेल गिफ्ट बघून सगळ्यांनाच छान वाटतं,आनंद होतो.थोडक्यात काय तर गिफ्ट्स सगळ्यांना आवडतात मग माणसं आवडो किंवा न आवडो.मला असं वाटत की समोरच्याला आपण आवडतो की नाही,त्याच्याशी पटत का?ती व्यक्ती आपल्याला काय गिफ्ट देणार आहे?किंवा गिफ्ट देणार आहे का?या गोष्टी जरा बाजूला ठेवल्या न....तर आपल्याला गिफ्ट देण्याचा आनंद मिळतो आणि ती घेणाऱ्याला विचित्र वाटत नाहींसा माझा अनुभव आहे.मला तुझ एक म्हणण पटल की आपल्याला ती व्यक्ती जर आवडत नाही तर का गिफ्ट द्यायची!पण आपण जे शिकतो,त्यानुसार प्रत्येक माणूस हा माणूस म्हणून चांगलाच असतो.हं प्रत्येकात वाईट गोष्टी असतात.पण त्या आपल्यातही आहेत.जोपर्यंत त्या व्यक्तीपासून आपल्याला,आपल्या लोक काही त्रास,धोका नाही,तोपर्यंत त्यांच्याशी किमान चांगल वागायला आपला काय जात?कदाचित त्या गिफ्ट देण्यामुळे त्या व्यक्तीचे विचार बदलतील...आपले वाईट विचार चांगले होण्यासाठी मदत होत असेल...तर गिफ्ट का देऊ नये!!आणि मित्रा,काकूना मी निरोप पोहोचवाण्यापेक्षा तूच का नाही सांगत?तिलाही पत्र लिही मस्तपैकी!तिलाही आवडेल.

अरे आणि एक गोष्ट,ते गिफ्ट मागचं अर्थकारण वगरे पटल मलाही.पण गिफ्ट प्रत्येकवेळी काहीतरी महागडी,शोभेची,स्टेटस दाखवणारी वगरे  वस्तूच असावी असं अट्टाहास का?गिफ्ट काहीही असू शकते....विचार कर........

मी परवा एक भयानक पुस्तक वाचल....म्हंजे रत्नाकर मतकरी वगरे नव्हे..... भयानक सत्यस्थिती -"प्लाटफॉर्म नंबर झीरो".अरे तुला आठवत का मी  एफवाय नन्तर "आसरा"नावाच्या संस्थेत जायचे.तिथे रेल्वेस्टेशन वर राहणारी मुलं यायची.त्यांच्याचबद्दल पुस्तक आहे हे.पण मी ऐकल होत त्यापेक्षा भयानक जीवन आहे रे त्यांच....प्रत्येकाचे जीवनानुभव एवढे वेगवेगळे आहेत पण सगळ्याची परिणीती एकचं....स्टेशनवर राहणे.एवढ्या लहान वयात एवढा भावनिक,शारीरिक त्रास,ताण कसा सहन करत असतील रे ही  मुलं!!!आणि आपल्याला आपला ताण खूप जास्त वाटतो...किती विचित्र आहे हे सगळ....एकीकडे श्रीमंताच्या मुलांना पैशाची किंमत कळावी म्हणून रियालिटी शो करतात आपल्याकडे आणि ते तुफान चालतात.आणि दुसरीकडे प्रत्येक पैशा-पैशाची किंमत कळणाऱ्या मुलांकडे कोणाच लक्षही नाहीये.......

इथे सगळे मजेत आहेत.मी अभ्यासाला सुरुवात करत्ये...म्हणजे कस आहे माहित्ये का ,खूप इंटरेस्टींग आहे,  पण अभ्यास करायचा म्हटला की मग जरा कठीण होऊन जात.मला जरा टेन्शन येतं परीक्षेचं.बघूया काय होतं ते!

तुझा नाटक कस चाललाय?लिहून पूर्ण झाला का?कशावर आहे?मला उत्सुकता आहे तू काय लिहिलयस ते वाचण्याची!मला नक्की सांग हं...बाकी काय?तुझा अभ्यास वगरे कसा चाललाय?आता तिथे थंडी असेल न?जाम मज्जा न...मस्त बर्फ वगरे पडत असेल...वाह!क्या बात हे!पण खूपच थंडी वाजत असेल न..काळजी घे!!
बाय!मिस यु!
-राधा