Thursday, 8 December 2011

पत्र ३

Hiii राधा!!!

तू खूपच इम्प्रेस झालेली दिसत्येस !!नाही म्हणजे ते असतीलही खूप छान वगरे.पण एवढी काम एकत्र करणारी व्यक्ती नक्कीच वेडी असणार.......तुला हे आत्ता पटणार नाही,थोड्या दिवसांनी नक्कीच पटेल.
ते जाऊ दे!कशी आहेस तू?कॉलेज कस चाललय?अभ्यास करतेस ना  मधून मधून तरी!! :P
"गांधीहत्या आणि मी"नाही झाल वाचून माझ.सुरुवात वेगात होती पण नन्तर जरा कंटाळाच आला मला.एकसुरी वाटलं ग.अजून अर्धच वाचलय.पण मला एक कळत नाहीये,नथुराम गोडसेंनी गांधीजींचा वध केला (असाच लिहिलंय न) त्याबद्दल फासावारही गेले.आपण इतिहास तर बदलू शकत नाही,मग त्याची एवढी चर्चा कशाला करायची??गांधीजींची आठवण तर त्यांचा आडनाव लावणाऱ्या लोकांनाही नाहीये आणि आपण उगाच आपला वेळ वाया घालवतोय!!!

हं angels and demons मस्तच आहे.पण त्यात लगेच dan brown प्रेम वगरे करण्यासारखा काय आहे त्यात??/तुम्ही मुली पण न चायला......जे समोर दिसतात त्यांन तुम्ही चुकूनही भाव देत नाही आणि जो लेखक भेटण्याची शक्यताही फार कमी आहे अशा माणसावर प्रेम वगरे करत बसता.........

आता जरा मूळ मुद्याकडे वळूया.तुझं पत्र वाचल्यावर मला असं वाटतंय की तुला refreshment ची अतिशय गरज आहे.खूप दिवसात काही वेगळा केला नाहीस का?म्हणजे काहीतरी छंद......संगीत,खेळ आणि महत्वाचा म्हणजे य वर्षांपूर्वी सोडून दिलेला लेखन.तू बहुतेक आजकाल काही लिहीतच नाहीस न (अर्थात ही पत्र सोडून)?आणि जरा पकाव वाटेल पण खरं सांगतोय,PLAN YOUR DAY,LOVE IT AND ENJOY IT!!सारखा दिनक्रम बदलला तरीसुद्धा त्रास होतो.म्हणजे एक दिवस लवकर उठायच,एक दिवस जागायच असं करू नकोस.त्रास होईल तुलाच!(आणि पर्यायाने मलाही).

इथे आता हळूहळू नाताळची तयारी सुरु होत्ये.एकदम दिवाळीसारखा वातावरण आहे.सुट्टीच्या वारी दुकानातली गर्दी,भरपूर सवलती,एकावर एक मोफतच्या  पाट्या,काही विचारू नकोस!!!कधी कधी मला असं वाटत की आपण उगाच खर्च करतो.सगळ तर असत आपल्याकडे.वर्षभर खरेदी चालूच असते.दिवाळीसाठी वेगळ काय घायच आणखी?आणि भेटवस्तूंच म्हणशील,तर काय घ्याव हेही सुचत नाही कधी कधी.सगळच तर असत आपल्याकडे.ना  घेणाऱ्याला अप्रूप ना  देणाऱ्याला!उगाच बाजारात चलन फिरवत रहायचं इकॉनॉमिक मोबिलीटी का काय ते!त्यातही 'अर्थ"शास्त्र आहेच!"ह्याने मला ५०० रुपयाची वस्तू दिली म्हणजे मलापण द्यायलाच हवी."अरे काय आहे हे?वस्तू महत्वाची आहे,तिची किंमत महत्वाची आहे की त्यामागची आपुलकी,प्रेम?उठसूट सगळ्यांना वस्तू देत सुटायच,मग ती व्यक्ती आवडो किंवा न आवडो.ह्याला काय अर्थ आहे? फक्त "लोकं काय म्हणतील"म्हणून भेटवस्तू देण किना घेण मला पटत नाही ग! खोट कशाला वागायच?कालच माझा वाद झाला आईशी.पण तिला काय,कोण आणि कसा सांगणार?शेवटी मीच थांबलो.एकतर बऱ्याच दिवसांनी मला जरा जास्त वेळ होता फोनवर बोलयला,त्यातही वादच घातला.उगाच भांडलो यार मी आईशी!!!मला खूप विचित्र वाटतंय.कधीतरी मी काय वेड्यासारखा वागतो ना .....एकदम विक्षिप्त! माझी जशी वेगळी मत आहेत तशी तिचीही असू शकतात की!एरवी व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने ओरडायच आणि असं वागायच.....किती वाईट न! आई,मी चुकलो,मला माफ कर!!!
अजून काही लिहू शकत नाहीये.थांबतो इथेच.

-जय
१० नोव्हेंबर २०११
ता.क.-take care!!.love  you!