हाय राधा!!!
मी काही खूप रागावलेलो वगरे नाहीये आणि कदाचित मी ठरवलं तरी तुझ्यावर रागावू नाही शकणार.. आणि मला सगळ्या रंगांशी प्रोब्लेम नाहीये पण म्हणून गुलाबी???!!?? किती करावं एखाद्याने !!
आणि काय ग स्वयपाक करता आल्याबद्दल अभिननदन???आणि ते पण तू माझ करत्येस!!! हे एकदम कोण कोणास म्हणालेच आहे बरं का … तुला येतो तरी का स्वयंपाक करता…उगाचच ४ अनारसे तळले म्हणून काहीही का!!!असो ….
एक चांगली गोष्ट झाली म्हणजे तुमची जर्नल्स तरी पूर्ण करून झाली आता खऱ्या अभ्यासाला सुरुवात!!उगाच टेन्शन आणि त्रास करून घेऊ नका!काम खूप आहे ,वेळ कमी आहे ,पण म्हणून तब्येतीची वाट लाऊन घेण्यात काही राम नाही!
मी आईला पत्र लिहून पोस्ट केल होत. त्यानंतर आईचा २ वेळा फोन येउन गेला पण ती काही म्हणाली नाही आणि आज अचानक पत्र आलं. मला एवढा आश्चर्य वाटल आणि खूप भरूनही आल होतं. तिने पत्रात लिहिला होतं की तिला पत्र वाचून फार आनंद झाला आणि तिला उत्तर लिहितानाही होतोय. तिने लिहिलं होतं की," तुला वाईट वाटलं यातच सगळं आलं. हरकत नाही आणि माझ्या असा लक्षात आलंय की तू जी चूक करत होतास तीच मीही करत होतेच की!म्हणजे जशी माझी काही मतं आहेत,तशीच तुझीही असणार की . मी तुला एवढंच सांगेन की तुला जे मनापासून पटतंय आणि योग्य वाटतंय तेच तू कर". मला हे वाचून खूप छान आणि मोकळ वाटल आणि तू म्हणतेस त्याचा पुन:प्रत्यय आला …बोलल्याने गोष्टी एवढ्या सोप्या आणि चांगल्या होऊ शकतात…. आवडलेलचं आहे । :)
तू मला विचारायच्या आधी तू सांग ,तू काय केलास वालेन्तीन डे च्या दिवशी?मैत्रिणीचा काय सांगत बसतेस ?कोणता वेडा मुलगा आला होता तुझ्याबरोबर ? मी काहीही केलं नाही.तुल तर माहित्ये मला असा काही आवडत नाही ,उगाच प्रेमाचं प्रदर्शन कशाला मांडायचं ?म्हणजे काय वर्षातला एकच दिवस लोक प्रेम करतात का?आणि परत काय करायचं तर गिफ्टची देवाण घेवाण ,हॉटेलात जाऊन खाणे,बस … हे तर काय वर्षभर चालूच असतं ,नाही का ।एक दिवस काय वेगऴ असणार आहे!!त्यामुळे मी नेहमीप्रमाणे अभ्यास केला,वाचन केलं ,खेळलो,गाणी ऐकली,मंमं आणि गागा!!
मी अजून अर्तिस्त बघितला नहिये.बघितल्यावर सांगतो ।पण खूप चांगल ऐकलय त्याच्या बद्दल.पण मी नक्की बघेन आर्तिस्त !!माझी सुधा आता २री टर्म जवळ आल्ये ,खूप अभ्यास बाकी आहे,म्हणजे मी वेळेत अभ्यास करून सुद्धा!!
आणि काय सांगतेस काय तुला माझी आठवण आली ??धन्य झालो मी!!खरं सांगतोय एकदम मस्त वाटला मला हे ऐकून! मला वाटलं मलाच फक्त तुझी आठवण येते की काय…म्हणजे मी इथे मी सगळ्यांना सोडून एकटा आलोय ,म्हणून मला जास्त आठवण येते ,तुझ्याजवळ बाकीची लोक आहेत ।म्हणजे आपला अख्खा ग्रुप ,पण इथे कोणीच नाहीये न…. पण तुला पण येत्ये म्हणजे हे नॉर्मल आहे,असं मी जाहीर करतो!!!
तुझ परीक्षेचं वेळापत्रक लागल का ?परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!काका काकूंना नमस्कार!!
-जय
३ मार्च २०१ २
ता. क. काळजी घे !!काही नाही, एवढंच सांगायचं होतं ……………